31/08/2018
🚩श्रीशिवचरित्र व्याख्यानमाला पुष्प ५ वे 🚩
दिनांक *रविवार २ सप्टेंबर २०१८*
*जन्माष्टमी*
संध्याकाळी ७ ते ८.३०
स्थळ *रमा माधव भवन, स्वर्णिमा सभागृहाच्या खाली*, संत श्री ज्ञानेश्वर संकुल, बापू बंगला चौक,इंदिरानगर नाशिक.
*प्रवेश विनामूल्य*
विषय:- *जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आणि युगपुरुष छत्रपती श्री शिवराय*
वक्ते:- *विजय खुटवड, पुणे*(शिवचरित्रकार, प्रवचनकार, अभ्यासक)
रोज सूर्योदय होतो आणि सूर्यास्त ही..!!! दिवस येतो आणि जातो सुद्धा. पण काही दिवस असे असतात की आपण नकळतपणे त्या दिवसाची वाट पाहत असतो. एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अवतरणाची स्मरणाची, त्याने गाजवलेल्या अचाट पराक्रमाची, कोणावर केलेल्या कृपेची.... ती तिथी असते. असा पराक्रम, अशी कृपा करून भारतातील अशा अगणित व्यक्तिमत्वांनी शतकानुशतके मानवांच्या अंतःकरणावर राज्य केले आहे. त्यांना शतकांची कुंपणे अडवू शकत नाही आणि विस्मृतींचा त्यांना शाप लागूच शकत नाही, काळाच्या ओघात ते हरवून जात नाहीत.
सकल जगाच्या कल्याणासाठी, धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेणारे, संपूर्ण भारताच्या भावजगताचे सम्राट म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे महान विभूतीमत्व म्हणजे जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण...! तर भगवान श्रीकृष्णांना आदर्श मानून आपल्या जीवनाची रचना करणारे आणि त्याच पद्धतीने स्वराज्याची रचना करणारे, अवघ्या महाराष्ट्राच्या प्रेरणेचा स्रोत बनून राहिलेले श्री शिवराय...!
या दोन व्यक्तिमत्वांनी आपली नीती, पराक्रम, चातुर्य, तत्वनिष्ठा आणि धर्मसंस्थापनेचे महान कार्य यामुळे संपूर्ण मानवजातीला मोहिनी घातली आहे. श्रीशिवराय रामायण महाभारतातील कथा ऐकत त्यातून प्रेरणा घेत मोठे झाले. त्यांच्या साठी हिरो होते श्रीकृष्ण...! श्रीकृष्णांची नीती वापरून त्यांच्यासारखाच अचाट पराक्रम श्री शिवरायांनी केला. त्यामुळे या दोन विभूतीमत्वांच्या जीवनात, योजनेत, पराक्रमात खूप साम्यस्थळे आहेत.
*जन्माष्टमीला स्मरण करूया भगवान श्रीकृष्णांच्या अवतार कार्याचे आणि श्री शिवरायांच्या नीतीचे...!!!*
आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.....